वारकरी संप्रदाची माउली मानल्या जाणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आषाढीसाठी आळंदीतून आज पंढरीसाठी निघाला. इंद्राणीकाठी मंगळवारी पर्जन्यराजाच्या साक्षीने भक्तीचा महापूर आल्याचे चित्र होते. जवळपास दोन लाख भाविक येथे असावेत असा अंदाज आहे.
ज्या पर्जन्यराजाची प्रतीक्षा पुणे भागात केली जात होती त्याचे आगमन मंगळवारी माउलींच्या प्रस्थानादरम्यान होते. सकाळपासून आभाळ भरून आले होते. कधी रिमझिम तर कधी पावसाचा मोठय़ा सरी कोसळत होत. इंद्राणीकाठी वारकर्यांनी पवित्र स्नानासाठी गर्दी होती. याचबरोबर नदीचे पूजन करताना महिला भाविक दिसत होत्या.