नातेवाईकांचे काही सल्ले असे देखील असतात. जे तुमच्या नात्याला तोडू शकतात. तसेच जोडीदारासोबत असलेले नाते तुटू शकते. एक चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य असते त्यामधील असलेली साकारात्मकता, जी तुम्हाला पुढे नेण्यास मदत करते व आनंद देखील देते. जर असे होत नसेल तर समजा की नाते तुटू शकते. दोघांमधील गोष्ट नातेवाईकांना समजल्यास नातेवाईक, इतर लोक सल्ले द्यावयास लागतात. त्यामुळॆ नाते आणखीन बिघडू शकते.
वेळे बरोबर सर्व ठीक होईल-
नातेवाईकांनी दिलेला सल्ला मानून तुम्ही हातावर हात ठेऊन बसू शकत नाही की, वेळेसोबत सर्व ठीक होईल. कारण अनेक वेळेस वेळ हातातून निघून जाते आणि नाते तुटायला लागतात. याकरिता जेव्हा तुमच्या नात्यामध्ये कडूपणा किंवा गैरसमज निर्माण होतील तेव्हा एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करावे.
सासर सोडण्याचा उपदेश-
पती-पत्नीमध्ये गैरसमज झाल्या नंतर नातेवाईकांचा उपदेश असतो की, सासर सोडून दे. त्यांच्या अनुसार सासू-सासरे यांपासून वेगळे राहिल्यावर सर्व ठीक होत. पण जर तुम्हाला तुमचे नाते टिकवायचे असेल तर नातेवाईकांचे उपदेश ऐकू नये.
घरातील काम महिलांनाच शोभून दिसते-
महिला घरातील सर्व काम करतात, पण जर कधी तुम्ही नातेवाईकांच्या समोर पतिला छोट्याश्या कामात मदत करण्यास सांगितले तर नातेवाईक टोमणे मारतात की, घरातील काम पुरुषांचे नसते आणि गोष्ट इतर लोकांना देखील सांगतील. या प्रकारे ही गोष्ट घराच्या बाहेर जाईल. घरात पुरुष काम करतात. यामुळे पतीच्या व्यवहारात बदल होतो, अशावेळेस मनमोकळे पणाने बोलावे.
कमीपणा घ्यायचा नाही-
दोघांमधील मतभेत नातेवाईकांना समजले तर अनेक सल्लगार उपदेश द्यायला येतील की, कमीपणा घ्यायचा नाही. त्यांच्या या उपदेशावर लक्ष देऊ नये कारण हा सल्ला तुमचे चांगले नाते तोडू शकतो. नाते टिकवून ठेवण्यासाठी अनेक वेळेस छोटया छोटया गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते.
प्रेग्नेंसी प्लॅन करा-
नात्यामध्ये होणारे मतभेत जर नातेवाईकांना कळले तर त्यांचा पहिला उपदेश असतो की, अजून आपत्य होऊ देऊ नका, प्रेग्नेंसी प्लॅन करा, सर्व ठीक होईल. प्रेगनेंसी प्लॅन करण्यापूर्वी नात्यांमधील गैरसमज दूर करणे योग्य राहील. बाळाला जन्म देण्याचा निर्णय पती-पत्नीचा असावा, नातेवाईकांचा नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा