Festival Posters

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

Webdunia
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
 
15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो. त्याला उघडून फडकावला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting आणि ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling हा शब्द वापरला जातो.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील असतात. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
जागेचा फरक
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान तेथे ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात?
पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

होर्मुझची सामुद्रधुनी सुरु झाली; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये १०% भाडेवाढीमुळे एसटी बसचा प्रवास महाग झाला

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य, नियमांचे उल्लंघन केल्यास मान्यता रद्द होणार

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments