Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक

Webdunia
राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.

राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले.

सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments