Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी

Round up 2017 in Marathi
Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:21 IST)
या २०१७ वर्षातील पावसाला हा मुंबई आणि राज्यातील अनेक भागांसाठी फार त्रासदायक ठरला आहे. यावर्षी पाऊस झाल्याने मात्र राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. तर जवळपास १४ वर्षांनी मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे, जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहेत.
 
सप्टेंबर महिन्यात पावासने मुंबईला अक्षरक्षह झोडपून काढेल होते. मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.तर दुसरीकडे येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.
 
मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं होते. पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत होते. प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक  त्यामुळे अनेकदा विस्कळीत झाली होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. २७ ऑगस्टपर्यंतचा गेल्या वर्षी १९३० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २०१७ मध्ये  २३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होत आणि ते पाणी जाण्यासठी उघडलेल्या  ड्रेनेज मध्ये  घसरले आणि वाहून गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.ऑगस्ट मध्ये दिवसभरात केवळ आठ तासात ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मान्सूनचा हा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गुडघ्यावर बसवायला लावले, कलमा म्हणण्यास सांगितले... दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले LIC अधिकारी सुशील नथानियल कोण होते?

LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहलगाम घटनेचा निषेध करत दिली प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा मृत्यू : एकनाथ शिंदे

India-Pakistan War भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार का? ग्रह नक्षत्र काय संदेश देत आहेत?

खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या हैदराबादचा सामना विजयी मार्गावर परतलेल्या मुंबईशी होईल

पुढील लेख
Show comments