Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युक्रेन संकट: बुखारेस्टहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईला रवाना, रोमानियातील भारतीय राजदूतांनी दिला भावनिक संदेश

Webdunia
शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (17:34 IST)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीयांना घेऊन रोमानियाहून पहिले विमान काही वेळापूर्वी मुंबईला रवाना झाले होते. रशियासोबत वाढत्या तणावामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यानंतर अडकलेल्या भारतीय नागरिकांना पर्यायी मार्गाने बुखारेस्ट येथे नेण्यात आले.
 
हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते त्याचे स्वागत होईल. जयशंकर यांनी ट्विटरवर विमानातील लोकांची छायाचित्रे शेअर केली आणि म्हणाले की, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात भारत प्रगती करत आहे.
 
 
ते म्हणतात, "संपूर्ण भारत सरकार सर्वांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आणि जोपर्यंत आम्ही शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढत नाही तोपर्यंत आमचे मिशन पूर्ण होणार नाही." त्यांनी विमानाच्या माइकवरून युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीयांना हा दिवस म्हणजे २६ फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या आयुष्यात लक्षात ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, "जेव्हाही आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा हा दिवस लक्षात ठेवा."
 

संबंधित माहिती

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

पुढील लेख
Show comments