Mangalagaur Pooja Vidhi मंगलागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावे.
पूजासाहित्य
हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दूर्वा, बेल, तुळशी, उदबत्ती, कापूर, निरांजन, काडवाती, कापसाची वस्त्रे, विडयाची पाने १२, सुपार्या २५, नारळ २, गूळ- खोबरे, खारका ५, बदाम५, पेरु २, केळी २, वासाचे तेल, पंचामृत, तीळ, तांदूळ, गहू, मुगाची डाळ, जिरे व इतर धान्ये व पाच रुपयांची सुटी नाणी.
प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळदकुंकू वाहून देवापुढे विडा (विडयाची पाने दोन त्यावर एक सुपारी) ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना म्हणजे उपाध्यायांना व वडील मंडळींना नमस्कार करुन आसनावर बसावे. नंतर पूजेला सुरुवात करावी.
द्विराचम्य ० पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्राशन करावे. चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे .