Festival Posters

श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:07 IST)
शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांच्या लहानपणाचे नाव गोविंद राय असे होते. वडील गुरु तेगबहादुरजी यांच्या नंतर ते वयाच्या नवव्या वर्षीच शिखांचे दहावे गुरु झाले. ते आध्यात्मिक गुरु असून निर्भयी योद्ध, कवी आणि दार्शनिक होते. 
 
शिखांसाठी 5 वस्तू केस, कंगवा, कडा, कच्छा आणि किरपान यांचा समावेश आहे. यांना पाच ककार असे म्हटले जाते आणि अमृत किंवा शीख-दीक्षा घेणार्‍या प्रत्येक शिखाने हे धारण करणे आवश्यक आहे. हे आदेश गुरु गोबिंद सिंग यांनीच दिले होते. 
 
अमृत किंवा शीख-दीक्षा प्रत्येक शिखाने घेणे आवश्यक आहे. दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना पाच क-वस्तू स्वतःकडे अहोरात्र बाळगाव्या लागतात. त्यांत केस (न कापलेले केस), कंगा (कंगवा), कडा (लोखंडी किंवा स्टीलचा कडा), कच्छा (लांब विजार), किरपान (तलवार) यांचा समावेश आहे. 
 
गुरु गोविंदसिंग यांनी संस्कृत, फारशी, पंजाबी, आणि अरबी भाषा शिकल्या होत्या. सोबतच त्यांना संपूर्ण शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. ते लेखक देखील होते आणि त्यांनी दसम ग्रंथ साहिब रचित केली होती. ते विद्वानांचे संरक्षक मानले जात होते. त्यांच्या दरबारात नेहमी 52 कवी आणि लेखकांची उपस्थिती राहत असे म्हणून त्यांना संत शिपाही असे म्हटले जात होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments