Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायनाला 'चायन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं' उपविजेतेपद

Webdunia
सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (10:41 IST)
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला रविवारी चीन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरेईने सायनाचा १२-२१, १५-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम फेरीचा हा सामना अजिबात रंगला नाही. अवघ्या ३९ मिनिटात सामन्याचा निकाल लागला. आपल्या खेळाने ली वर दबाव निर्माण करण्यात सायना अपयशी ठरली. उलट ली ने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. याआधी नऊ वेळा ली शुरेईने विविध स्पर्धांमध्ये सायनाला पराभूत केले आहे. 
 
जागतिक क्रमवारीत ली ७ व्या स्थानी आहे. यंदाच्या हंगामात सायनाने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सायनाने या मोसमात इंडिया ओपन सुपर सिरीज आणि ग्राँड पिक्स गोल्ड स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यानंतर ऑल इंग्लंड आणि जागतिक स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 
 
फुलराणी सायनाने चीन ओपनमध्ये शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिने चीनच्या यिहान वांगचा ४१ मिनिटांत २१-१३, २१-१८ ने पराभव केला. 
 
सायना आणि यिहान यांच्यातील हा १३ वा सामना होता. त्यामध्ये सायनाने ४ तर वांगने ९ वेळा विजय मिळवला आहे. तर यंदाच्या वर्षी खेळण्यात आलेल्या तीन सामन्यात सायना विजयी झाली आहे. याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-१६, २१-१३ असे ४२ मिनिटांत सहज हरवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. 

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

Show comments