Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Olympic Day 2021: हा दिवस केव्हा, कसा आणि कोणी साजरा करण्यास सुरुवात केली हे जाणून घ्या

International Olympic Day 2021: हा दिवस केव्हा  कसा आणि कोणी साजरा करण्यास सुरुवात केली हे जाणून घ्या
Webdunia
बुधवार, 23 जून 2021 (09:50 IST)
23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस २३ जून १९४८ ला साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम या देशांनी एकत्रित येऊन पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस आयोजित केला. तत्कालीन या संघटनेच्या अध्यक्षांनी जगभरातील तरुणांना ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन खेळाला त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले होते.
  
त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते?
ग्रीक उद्योगपती डेमेट्रिओस विकेलस हे पहिले अध्यक्ष होते.
 
आयओसी मुख्यालय
आयओसीचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे असून त्याचे जगभरात 205 राष्ट्रीय ऑलिंपिक समित्या सदस्य आहेत.
 
उद्देश
हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व वर्ग आणि वयोगटातील लोकांच्या खेळाला सहभाग देणे. आयओसी दर चार वर्षांनी ग्रीष्मकालीन ऑलिंपिक खेळ, हिवाळी ऑलिंपिक खेळ आणि युवा खेळ आयोजित करतात.
 
पहिल्यांदा भारताने कधी भाग घेतला?
1900 मध्ये प्रथमच ऑलिंपिकमध्ये भारताने भाग घेतला होता. त्यानंतर ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्यपदके जिंकणार्या भारताकडून फक्त एक अॅथलीट नॉर्मन प्रिचर्डला पाठवले गेले  होते. तथापि, 1920 मध्ये भारताने प्रथमच ऑलिंपिकमध्ये अधिकृतपणे भाग घेतला. आतापर्यंत भारताने ऑलिंपिक स्पर्धेत 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदकांसह एकूण 28 पदके जिंकली आहेत. सर्वाधिक पदके भारतीय हॉकी संघाने जिंकली आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments