Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (14:17 IST)
भारताच्या सायना नेहवालला मागील काही स्पर्धांत चमकदार कामगिरी करता आलेली नाही; पण गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 2010च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.
 
सायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.
 
मी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.
 
त्याचबरोबर तिच्या सुवर्णपदकाने भारताने (38 सुवर्ण) पदकतक्त्यात इग्लंडला (37 सुवर्ण) मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे 2010च्या स्पर्धेच्या आठवणी कधीही विसरणार नाही, असे सायना म्हणाली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याची तयारी केली, अजित पवार गटात सामील होतील

अनियमिततेप्रकरणी महाराष्ट्र वन विभागाचे तीन अधिकारी निलंबित

LIVE: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात अपील दाखल करणार

दिल्लीतील रोहिणी परिसरातील मंदिरात लागलेल्या भीषण आगीत पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

माजी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती

पुढील लेख
Show comments