Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुनील क्षेत्रीने महान खेळाडू पेलेला मागे टाकले, भारताने मालदीवचा पराभव करत सैफ चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:59 IST)
कर्णधार सुनील क्षेत्रीच्या दोन उत्कृष्ट गोलमुळे भारतीय पुरुष फुटबॉल संघाने यजमान मालदीवचा पराभव करून SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. संघाने मालदीवचा 3-1 असा पराभव केला. रविवारी अंतिम सामन्यात भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. या सामन्यात दोन गोल करणाऱ्या सुनील क्षेत्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत क्षेत्रीने आता ब्राझीलचा महान खेळाडू पेलेला मागे टाकले आहे. 
 
मालदीवविरुद्ध दोन गोल केल्यामुळे ते सैफ चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू बनले आहे. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत ते आता अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या मागे फक्त एक गोल मागारी आहे. मेस्सीच्या नावावर 80 आंतरराष्ट्रीय गोल आहेत, या दोन गोलसह, छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या 79 वर गेली आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 33 व्या मिनिटाला फॉरवर्ड मनवीर सिंगने केलेल्या गोलच्या मदतीने भारताने सामन्यात आघाडी घेतली. मात्र, भारतीय बचावपटू प्रीतम कोटलने विरोधी फटकेबाज हमजा मोहम्मदच्या शॉटवर आव्हान दिल्यानंतर 45 व्या मिनिटाला पेनल्टीमुळे मालदीवला बरोबरीची संधी मिळाली आणि मालदीवचा कर्णधार आणि फॉरवर्ड अली अशफाकने संधी सोडली नाही आणि 1 -1ने गोल केला.पण, यानंतर भारतीय कर्णधाराने आपला खेळ  दाखवून संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments