Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ दूर होईल : हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:31 IST)
Hindikesari Pai santosh aba vetal
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कुस्त्या झाल्या नाहीत. या क्षेत्राला एकप्रकारे मरगळ आली होती. मात्र साताऱ्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीला नवचैतन्य प्राप्त होऊन कुस्तीला आलेली मरगळ दूर होईल, असा विश्वास हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
 
पै. संतोषआबा वेताळ म्हणाले की, पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. श्रीरंगआप्पा जाधव यांनीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. महाराष्ट्र केसरीच्या एकूण 5 गदा सातारा जिल्हय़ातील मल्लांनी आतापर्यंत आणल्या आहेत. सहावी गदा पै. किरण भगत याच्या रूपाने जिल्हय़ाला मिळेल, असा विश्वास आहे. तो नक्कीच सार्थकी ठरेल.
 
गेली 3 ते 4 वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यात व्हावी, असा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र स्पर्धा पुण्यातच होत होती. देशाचे नेते शरद पवार यांचे सातारा जिल्हय़ावर विशेष प्रेम असल्याने यावर्षी स्पर्धा त्यांनी साताऱ्याला दिली आहे. या स्पर्धेतून कुस्ती क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त होईल. स्पर्धेतून ऊर्जा घेत गावोगाव मैदाने, आखाडे भरतील. यामुळे गावोगावच्या मल्लांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे मैदानेच न भरल्याने मल्लांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीवर आलेले मरगळीचे सावट दूर होईल. या स्पर्धेतून उदयोन्मुख मल्लांना मोठी प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.
 
महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आतापर्यंत पुण्याला जास्त वेळा झाली आहे. साताऱ्यात ही स्पर्धा 59 वर्षानंतर होत आहे. कुस्तीतील महत्वाची असणारी ही स्पर्धा साताऱ्यात होणे ही जिल्हय़ासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांच्या सहकार्याने साताऱयातील स्पर्धा यशस्वी केली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीला नवी ऊर्जा प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे पै. संतोषआबा वेताळ यांनी सांगितले.
Photo: Twitter

संबंधित माहिती

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments