Festival Posters

निवडणूक नंतर मोबाइल रिचार्ज होईल महाग

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (13:07 IST)
जर तुमच्या जवळ मोबाईल असेल तर तुम्ही रिचार्ज करतच असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे तसेच तुमच्या कामास येईल. देशामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होईल आणि 4 जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक झाल्यानंतर  नवीन सरकारे बनल्यानंतर स्मार्टफोन यूजर्सच्या खिशावर ओझे वाढू शकते. असे बोलले जात आहे की, निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन 15 ते 17 टक्क्याने महाग करू शकतात. निवडणुकीनंतर स्मार्टफोन यूजर्ससाठी रिचार्ज करणे पहिल्यापेक्षा अधिक महाग होऊ शकते. आताच मिळलेल्या रिपोर्टनुसार टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्जशुल्क वाढवू शकतात. एंटीक स्टॉक ब्रोकिंगच्या रिपोर्टनुसार टेलिकॉम सेक्टरमध्ये शुल्क वृद्धि चे प्रकरण  काही दिवसांपासून पेंडिंग आहे आता यावर  4 जून नंतर कंपन्या मोठा निर्णय घेऊ शकतात.
 
ग्राहकांना खर्च करावे लागतील अधिक पैसे 
रिपोर्ट अनुसार रिचार्ज शुल्कमध्ये वाढलेल्या प्रमाणाचा फायदा सर्वात जास्त भारतीय एयरटेलला होईल. कंपन्यांकडून शेवटच्या वेळी रिचार्ज शुल्कमध्ये डिसेंबर 2021मध्ये वाढ केली होती. त्यावेळी कंपन्यांनी कमीतकमी 20 टक्के वाढ केली होती. आता 3 वर्षानंतर टेलिकॉम कंपन्यांनी स्मार्टफोन यूजर्सला एक मोठा धक्का देऊ शकतात. जर कंपन्या रिचार्ज शुल्कमध्ये 17 टक्क्यांनी वाढवत असतील तर याचा अर्थ आहे की, जर तुम्ही आजच्या डेट मध्ये काही प्लॅन 300 रुपये करत असाल तर तो रिचार्ज शुल्कमध्ये वाढल्यानंतर या प्लॅनसाठी  351 रुपये द्यावे लागतील. कंपन्यांच्या या निर्णयामुळे यूजर्सच्या खिशावर जास्त ओझे वाढणार आहे. 
 
एआरपीयूमध्ये होईल वाढ 
एयरटेल देशाची दूसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिचार्ज शुल्कमध्ये वाढ झाल्यानंतर एयरटेलला  सर्वात मोठा फायदा होईल. रिपोर्टअनुसार एयरटेलचा एआरपीयू 208 रुपये आहे. जेव्हा की, हा 2026-27 पर्यंत 286 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ, एयरटेल आणि वीआई तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये वाढला घेऊन कोणत्याही कंपनीकडून संकेत दिले गेलेले नाही. जर प्लॅन महाग होत असतील तर यूजर्सला कॉलिंग आणि डेटासाठी पहिल्यापेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागतील. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'या वेळी, थेट डोक्यात गोळी...' बिश्नोई टोळीकडून पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

नीळ्या ड्रमनंतर आता 'हिरव्या ड्रम'चं थरारक रहस्य! पती आणि भावासोबत मिळून प्रियकराचा काटा काढला

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

पुढील लेख
Show comments