Festival Posters

PM Kisan Samman Nidhi 6 हजार हवे असल्यास e-KYC फटाफट करा

Webdunia
गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (15:06 IST)
आपल्या देशात सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यातील काही राज्य सरकारे तर काही केंद्र सरकार चालवत आहेत. गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत आणि इतर लाभ मिळवून देणे हा या योजना चालवण्यामागील उद्देश आहे. प्रत्येक विभागासाठी योजना राबविल्या जात असताना, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. आतापर्यंत 11 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले असून, आता सर्व लाभार्थी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र यासाठी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मिळणारे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही ई-केवायसी कसे करू शकता.
 
ही शेवटची तारीख आहे
वास्तविक, तुमच्याकडे ई-केवायसी करण्यासाठी फारच कमी वेळ आहे कारण सरकारने त्याची तारीख 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत, या तारखेपूर्वी, तुम्ही ई-केवायसी करून घेतले पाहिजे.
 
अशा प्रकारे ई-केवायसी करता येते
जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल.
 
आता वेबसाइटवर गेल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला 'e-KYC' चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल.
 
यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि सर्च वर क्लिक करा.
 
त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक येथे भरावा लागेल, ज्यावर एक OTP येईल. हा ओटीपी येथे एंटर करा आणि असे केल्याने तुमचे ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments