Festival Posters

उत्तर प्रदेशच्या जनतेने शिवसेनेला नाकारले, काही ठिकाणी नोटापेक्षा कमी मते

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (15:27 IST)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये शिवसेनेने भाजपला चांगलेच आव्हान दिले होते. परंतु शिवसेनेचा सुपडा साफ होताना दिसत आहे.  काही ठिकाणी तर शिवसेनेला नोटापेक्षा कमी मत मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेनं महाराष्ट्रातील शिवसेनेला नाकारलं आहे. काही उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. यापूर्वीसुद्धा शिवेसेनेने २०१७ मध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळीसुद्धा यश मिळाले नव्हते.
 
उत्तर प्रदेश निवडणूकीमध्ये शिवसेनेने ४०३ जागांपैकी ५२ जागांवर आपला उमेदवार दिला होता. युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातील वजनदार नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले होते. 
 
शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांचा उत्तर प्रदेशमधला रोड शो फ्लॉप गेला आहे. शिवसेना स्वतंत्र लढत होती. काही उमेदवारांचे आता डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते.
 
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये खतौली, मेरठ कैंट, धौलाना, नोएडा, दादरी, सिकंदराबाद, अनूपशहर, डिबाई, मांट, मथुरा, खैरागढ आणि दक्षिण आगरा येथे उमेदवार दिले होते परंतु एकाही उमेदवाराचा करिष्मा चालला नाही. उत्तर प्रदेशमध्ये नोटाला ०.७१ टक्के मतदान आहे तर शिवसेनेला ०.०२ टक्के मतदान झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments