Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अमित शहांचा फोन उद्धव ठाकरेंना आलाच नाही'

Webdunia
सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (17:14 IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे. युती टिकविण्यासाठी अमित शहा यांनी उद्धव यांना फोन केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.

मात्र, प्रदेशअध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे शिवसेनेशी कोणतीही चर्चा होणार नाही, असा भाजपचा अंतिम निर्णय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजप समोर 151-119-18चा प्रस्ताव पाठवला होता. भाजप स्विकारावा, यापेक्षा जास्त जागा देणे शक्य नाही. हा अंतिम प्रस्ताव असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते जास्त जागांसाठी ठाम राहिलेत. निवडणून न आलेल्या 19 जागांबाबत विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठकीत झाली. त्याबाबत शिवसेनेला पुन्हा आवाहन करण्याची मोर्चे बांधणी झाली. 

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

Show comments