Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वी बाबांची बोटचेपी भूमिका, अजित पवारांचा टोला

Webdunia
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (10:45 IST)
मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे खारघरचा टोलनाक्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेता आला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पृथ्वराज चव्हाण यांच्यामुळेच टोलनाक्यांचे प्रश्न रखडल्याची टीकाही अजित पवार यांनी केली. अजित पवार गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
पवार म्हणाले, खारघर टोलनाक्याचा राज्यातील 40 टक्के जनतेवर भार पडणार असल्याने एमएमआरडीए तसेच सिडकोच्या माध्यमातून तो 1200 कोटींना घेण्याचे आमचे मत होते. तसा प्रस्तावही तयार केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याने नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागेल, असा ठपका पवारांनी ठेवला.
 
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे तसेच छगन भुजबळ यांच्या खात्यांच्या कारभारावर बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जलसंपदा विभागावर आपल्याला सनदी अधिकारी नियुक्त करता आला. मात्र सार्वजिनक बांधकाम खात्यावर मात्र सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यश आले नसल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली होत‍ी. जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभारावर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले होते. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments