Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लुटणार्‍यांच्या हातात सत्ता देणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल

Webdunia
गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (10:47 IST)
महाराष्ट्राचे लचके तोडणार्‍याकडे महाराष्ट्राची सत्ता देणार का? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या जाहीर सभेत केला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर रोखठोक टीका केली. केंद्रात सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी शिवसैनिक लागतो, आता राज्यात का चालत नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
परभणी येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी दोन बालकांना व्यासपीठावर बोलावून आपल्या ई-शिक्षणाच्या प्रकल्पाची माहिती दिली.
 
राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकारने काश्मिरात दाखवलेली माणुसकी मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठीही दाखवावयास हवी होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाशी असलेले नाते भाजपने तोडले. ही वृत्ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, अशीच आहे. शिवजयंती साजरी करणारे आज छत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. आजही हिंदुत्वाची गरज असून ओवेसीचे विष येथे वळवळणार असेल, तर ती मस्ती शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

Show comments