Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर

Webdunia
सध्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना विरोध करता करता हिंदीलाही विरोध करायला सुरवात केली. मुंबईच्या सभेत तर त्यांनी राष्ट्रभाषा कोणती असावी या प्रश्नावरून घटना समितीतच कसे वाद होते, याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकातील उताराच वाचून दाखविला. याच विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार....... 

आपले मराठी साहित्य हे भारतीय साहित्याचे ऐक उपांग असल्याने भारतीय साहित्य जीवनाचे बरे वा वाईट परिणाम महाराष्ट्रीय साहित्यावर झाल्यावाचून रहाणार नाहीत. भारताची राष्ट्रभाषश हिंदी असावी असा हिंदुजगताचा निर्धार झाला नाही. काही बंगाली साहित्यिकांनाही वाटले की बंगाली हीच देशाची राष्ट्रभाषा असावी, तसे मराठी साहित्यकांनाही वाटले की अटकेपर्यंत हिंदुध्वज फडकविणार्‍या आम्हा मराठ्यांची मराठी भाषा हीच भारताची राष्ट्रभाषा का असू नयेपण हा विचार योग्य नाही. संस्कृतनिष्ठ हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा असावी असे मी म्हणतो, याचे मुख्य कारण ती भाषा ऐकंदरीत अखिल भारतात बहुजन समाजाने इतर कोणत्याही भाषेतून अत्याधिक प्रमाणात बोलली जाते, समजली जाते, लिहील जाते आणि ती इतर कोणत्याही रीतीने राष्ट्रीय विचारांच्या विकासाला व प्रगतीला साहाय्यभूत होण्यास कोणत्याही प्रकारे अक्षम नही. ही दोन्ही लक्षणे हिंदीस इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा अधिक लागू आहेत. आज आठ कोटी लोक ती बोलत आहेत. खरे पहाता ती अशीच हिंदुस्थानची राष्ट्रबोली झालेली आहे. रामेश्वरापासून काश्मीर पर्यंत आज दोन सहस्त्र वर्षे झाली. लाखो हिंदू प्रवासी तीर्थतयात्री, व्यापारी जे जात येत, दळणवळण ठेवीत आले ते या हिंदी बोलीच्या बळावरच काय ते. निष्यान जुने साहित्यही भरपूर आहे. मराठक्षची ती सरखी बहीणच आहे. म्हणून मराठीला हिंदी राष्ट्रभाषा झाल्यास आनंद वाटावा, हेवा वाटू नये. हिंदीची वृत्तीही वरचढ नाही. महाराष्ट्राच्या हाताचा प्रेमाधार घेऊनच ती राष्ट्रभाषा पदावर चढत आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments