Dharma Sangrah

Lookback Sports 2024: T20 विश्वचषक ते रोहित विराटच्या निवृत्तीपर्यंत, हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी कसे होते जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (16:49 IST)
look-back-Sports: भारतीय क्रिकेट संघासाठी 2024 हे वर्ष काहीसे गोड आणि काहीसे आंबट होते. वर्षाच्या सुरुवातीला भारताने कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता, तर मध्यंतरी संघाला  टी-२० विश्वचषक जिंकण्याची चव चाखायला मिळाली. पण वर्षाच्या अखेरीस भारताला 12 वर्षात प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.

भारतीय संघाने या वर्षी एकूण 13 कसोटी सामने खेळले या मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध एक सामना जिंकला. नंतर पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. बांगलादेशचाही 2-0 असा पराभव झाला. पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर भारताला WTC फायनलमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. अलीकडेच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले, ज्यात एक जिंकला आणि दुसरा सामना गमावला.

टी-20 क्रिकेटमध्ये भारताने वर्चस्व दाखवले
T20 मध्ये भारताने 29 जून रोजी तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी जिंकली. नंतर लगेच कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने T20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. आता ते वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. 

विश्वचषकाच्या व्यतिरिक्त भारताने या वर्षी 18 T20 सामने खेळले आहे. भारताने पाच देशांच्या विरुद्ध खेळलेल्या मालिकेत विजय मिळवला. अफगाणिस्तान 3-0 ने, झिम्बाब्वे 4-1 ने, श्रीलंका 3-0 ने, बांगलादेश 3-0 ने आणि डी. आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला नवा टी-20 कर्णधारही मिळाला.

आयसीसी क्रमवारीत भारत चमकला
दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध  टी-20सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माने दोन शतके झळकावली. 
भारताच्या यंदाच्या क्रमवारीत भारताने चमकदारी केली असून वनडे, टी-20 आणि कसोटी सामन्यात भारत अव्वल आहे. कसोटी क्रमवारीत भारताची घसरण तिसऱ्या स्थानी झाली आहे. पण इतर दोन्ही मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

पुरुषाच्या फलंदाझीच्या क्रमवारीत भारतीय संघाचा रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. टी-20 च्या  क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनी कसोटी क्रमवारीत चमकदार कामगिरी केली.

भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाले आहे
टी-20 विश्वचषक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी गौतम गंभीर यांची नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर मॉर्नी मार्केलला गोलंदाजीचे प्रशिक्षक बनवले.डच खेळाडू रायन डोईशेटची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अभिषेक नायर भारतीय क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षक झाले.

वर्षातील एकमेव मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले
या वर्षात भारताने फक्त एकच एकदिवसीय मालिका खेळली त्यात भारताचा दारुण पराभव झाला. 
भारत श्रीलंका सामन्यात श्रीलंकाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.पहिली वनडे अनिर्णित राहिली तर भारताने दुसरी वनडे मालिका 32 धावांनी आणि तिसरी वनडे मालिका 110 धावांनी गमावली. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बांगलादेश भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळणार, आयसीसीने मागणी फेटाळली

पालघर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीला नमाज पठण करण्यास भाग पाडले, रॅगिंगची घटना समोर आली

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप

अकोल्यात काँग्रेस नेते हिदायतुल्ला पटेल यांची दिवसाढवळ्या हत्या; नमाज अदा करुन परतत होते

पुढील लेख
Show comments