Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना काळात केवळ 10 मिनिटं ध्यान करा आणि परिणाम बघा

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (19:15 IST)
अनिरुद्ध जोशी 
डॉ. म्हणतात की भीतीमुळे प्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. या साठी ध्यान करावे. जेणे करून आपल्या प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होते.या मुळे तणाव देखील नाहीसे होतात.कोणत्याही प्रकाराची भीती,काळजी इतर विकार देखील होत नाही.ध्यान केल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. सध्या कोरोनाच्या काळात ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे.
 
1 आजार आणि दुःख दोघांची उत्पत्ती मन,मेंदू आणि शरीराच्या ज्या भागात होते ध्यान त्या भागाला निरोगी बनवते.हे मन आणि मेंदू सकारात्मक ऊर्जाने भरते. आपले शरीर आजाराशी लढण्यात सक्षम होते. या मुळे आजाराचा नायनाट होतो.
 
2 ध्यान केल्याने श्वासोच्छ्वासात सुधारणा झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही.काळजी दुःख कमी होते. आपल्या भावना श्वासाने नियंत्रित केल्या जातात. योग्य  
श्वासोच्छवासामुळे भावना देखील नियंत्रित केल्या जातात.सर्व भीती, काळजी या मुळे दूर होते.बघण्याच्या दृष्टीकोन देखील सकारात्मक होतो.
 
3 ध्यान केल्याने उच्च रक्तदाब देखील नियंत्रित होतो. डोकेदुखी दूर होऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढते. शरीरात स्थिरता वाढते. या मुळे शरीर मजबूत होत.
 
4 दररोज तीन महिन्यासाठी फक्त 10 मिनिटं ध्यान करावे. या मुळे मेंदूत सकारात्मक परिवर्तन होतात. कोणत्याही प्रकाराच्या समस्येला सकारात्मक दृष्टीकोनाने सोडवू शकाल.ध्यान मध्ये फक्त तीन महिन्यांत सर्व प्रकारचे आजार नाहीसे करून दुःख दूर करण्याची क्षमता आहे.
 
5 ध्यान करण्यासाठी सर्वप्रथम स्नान करून कुशासनवर सुखासनात डोळे मिटून बसावे. आपल्याला डोळे फक्त 10 मिनिटासाठी मिटायचे आहे. या दरम्यान शरीराची हालचाल करायची नाही. डोळ्यासमोर येणाऱ्या अंधाराकडे बघावे आणि श्वासोच्छवासाच्या हालचाली ला अनुभवा. या वेळी आपल्या मनात अनेक विचार येतील आणि जातील त्या विचारांना जाणीवपूर्वक बघा. एक विचार येईल आणि जाईल लगेच दुसरा विचार येईल. मानसिक हालचाली कडे लक्ष द्या. आपल्याला जाणवेल की श्वासोच्छवासाच्या हालचाली कडे लक्ष दिल्यावर मानसिक हालचाल थांबते. आपल्याला हेच करायचे आहे.  
 
 

संबंधित माहिती

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

पुढील लेख
Show comments