Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

7 killed in wall collapse in Pune
Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (09:58 IST)
प्रचंड पावसामुळे पुण्यातल्या आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता असून एनडीआरएफच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
टांगेवाला कॉलनी नाल्याच्या अत्यंत जवळ असून बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर पाणी वाढले. हे पाणी कॉलनीतल्या घरांमध्ये घुसले. त्यामुळे भिंत खचून सात जणांचा मृत्यू झाला.
 
सापडलेल्या पाच मृतदेहांपैकी तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करत होती. मृतदेहांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments