केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला, मात्र पश्चिम बंगाल सरकारने ही योजना राज्यात लागू केली नाही.
कारण या योजनेत पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे यात कोणाला कमिशन मिळत नाही म्हणूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्रीय योजनांना विरोध आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.