Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दलितांवर अन्याय झाल्यावर नरेंद्र मोदी गप्प का असतात? - राज ठाकरे

Narendra Modi
Webdunia
शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (12:04 IST)
गुजरातच्या उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा पंतप्रधान गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमधल्या अकलूज येथे भाषण करताना स्वत:च्या जातीचा उल्लेख केला. खालच्या जातीतले आहोत म्हणून आपल्यावर आरोप होत आहेत असं मोदी म्हणाले मग गेल्या 5 वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता? दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
 
उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments