rashifal-2026

पाण्याने दिवा जळतो असे रहस्यमयी माता भवानी मंदिर गाडियाघाट

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2024 (07:30 IST)
India Tourism : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. तसेच यामधील अनेक मंदिरे रहस्यमयी देखील आहे. जेथील रहस्य अजून देखील उघडले नाही. 
 
तसेच आज आपण अश्याच एका रहस्यमयी मंदिराबद्दल पाहणार आहोत. भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये गाडियाघाट गावात माता भवानीचे 'एक मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून या मंदिराची विशेषतः म्हणजे जिथे तेल किंवा तुपाच्या ऐवजी पाण्याने दिवे लावले जातात? तसेच हे मंदिर रहस्यमयी म्हणून देखील ओळखले जाते. 
 
तसेच भारतातील प्रत्येक शहरात अनेक मंदिरे आहे. काही मंदिरांचे रहस्य आणि चमत्कार जाणून भक्तांना देखील अनेकदा आश्चर्य वाटते. पण तुम्हाला माँ भवानीच्या या मंदिराबद्दल माहिती आहे का, जिथे पाण्याने दिवे लावले जातात?  
 
गाडियाघाट मंदिराचे रहस्य-
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून गाडियाघाट माता मंदिरात केवळ पाण्यानेच दिवे लावले जात आहे. यामागील गूढ अजून कोणालाही उकलता आलेले नाही. हे मंदिर मध्य प्रदेश राज्यात असून गाडियाघाट माता मंदिर शाजापूर जिल्ह्यातील नळखेडा गावापासून 15 किलोमीटर अंतरावर गाडिया गावाजवळ आहे.
 
या मंदिरात महाज्योती जळत असल्याचे मानले जाते. तसेच देवीसमोर लावलेला हा दिवा लावण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर केला जात नाही. या मंदिराचा चमत्कारिक दिवा पाण्याने जळतो. मंदिराजवळून वाहणाऱ्या कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये टाकले जाते, तेव्हा हे पाणी चिकट तेलात बदलते ज्यामुळे दिवा जळतो.
 
असे मानले जाते की एकदा देवीने या मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांनी कालीसिंध नदीच्या पाण्याने दिवा लावण्याची आज्ञा केली. तेव्हापासून या मंदिराचा दिवा तेल किंवा तुपाच्या ऐवजी या नदीच्या पाण्याने प्रज्वलित केला जातो. जर तुम्हीही माता भवानीचे भक्त असाल तर या चमत्कारिक मंदिराला नक्कीच भेट द्या. तसेच नवरात्रीच्या दिवसात या मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

सर्व पहा

नवीन

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

एकता कपूरची सुपरहिट मालिका "पवित्र रिश्ता" द्वारे घराघरात लोकप्रिय झालेला बॉलिवूडचा सुपरस्टार बनला

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

Akshay Kumar accident मुंबईत अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा व्हॅनला भीषण अपघात

पुढील लेख
Show comments