Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत तुलसीदास पुण्यतिथी

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (11:52 IST)
भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतवर्षात अनेक महान संत होऊन गेलेत. त्यापैकीच एक महान संत आहे संत तुलसीदास. आज संत संत तुलसीदास यांची पुण्यतिथी आहे. संत तुलसीदास हे मध्यकालीन हिंदी साहित्याचे महान कवी होते. तसेच ते परम रामभक्त होते. 
 
संत तुलसीदास यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील यमुना नदीच्या काठावर चित्रकूटच्या राजापूर नावाच्या गावात झाला होता. तसेच नंतर किशोर वयात आल्यानंतर त्यांचा विवाह रत्नावली सोबत झाला  होता. जेव्हा पत्नी माहेरी गेली त्यांना राहवले नाही. तुलसीदासांचे पत्नीवर नितांत प्रेम होते. तुलसीदास पत्नीला भेटण्यासाठी रात्री नदीमधून पोहत गेले. व रत्नावली ने तुलसीदासांना खूप रागावले. यानंतर तुलसीदासांनी संसाराचा त्याग केला. व पवित्र शहर प्रयाग करीत निघून गेले. व गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी साधुत्व पत्करले. तसेच भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झाले. यानंतर त्यांनी श्रीरामचरितमानसची रचना आरंभ केली. संत तुलसीदासांना श्रीरामचरितमानसचे रचियता देखील म्हणतात. 
 
तसेच तुलसीदासांनी अखंड प्रभू श्रीरामाची भक्ती केली. विलक्षण तेज त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. एकदा संत तुलसीदास हनुमानाचे ध्यान करीत होते. तेव्हा हनुमानजींनी साक्षात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले व प्रार्थनाचे पद रचण्यास सांगितले, यानंतर त्यांनी आपली शेवटची कृति विनय-पत्रिका लिहली आणि तिला भगवंताच्या चरणात अर्पित केले. प्रभू श्रीरामांनी स्वतः त्यांना आशीर्वाद दिले.
 
यानंतर संवत्‌ 1680 मध्ये संत तुलसीदासांनी "राम-राम" म्हणत आपले शरीर त्यागले. संत तुलसीदास हे भारतवर्षातील महान संत होते. ज्यांनी श्रीरामचरितमानस लिहले. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments