Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रतिभावंत साहित्यकार शिवराम महादेव परांजपे

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (22:41 IST)
मराठीचे एक प्रतिभावान मराठी साहित्यकार,उपरोधी शैलीचे लेखक, झुंझार पत्रकार प्रख्यात राजकारणी शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म  27 जून 1864 रोजी महाड येथे झाला.त्यांचे प्रारंभिक शिक्षण महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे झाले.
डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांना ''भगवानदास ''आणि ''झाला वेदांत'' पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यानंतर त्यांची पुणे येथील महाराष्ट्र महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
जेव्हा देशाचे वातावरण तापले होते तेव्हा त्यांनी जनमानसात देशभक्तीची ज्वाला पेटविली आणि  'काळ' आणि 'स्वराज्य' नावाची साप्ताहिक वृत्तपत्रे काढली.ही वृत्तपत्रे जनमानसाच्या मनात देशभक्ती आणणारी होती.

ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यात त्यांना यश आले. या साठी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लागला आणि त्यांना 19 महिन्याचा तुरुंगवासाच्या सामोरी जावे लागले. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते गांधीजींचे समर्थक झाले.त्यांनी आपले आयुष्य ललित वाङ्मय, न्याय, ज्ञानशास्त्र,मराठा युद्धे,शूद्रांची व्युत्पत्ती अशा अनेक विषयांवर लिहिले. त्यांची व्यंगात्मक शैली प्रभावी होती.ते मराठीचे गद्यकवी होते.   

'काळातील' प्रक्षोभक लेखनामुळे त्यांना 'काळकर्ते' म्हणून संबोधले.फर्डे वक्ते असणारे शिवराम आपल्या अस्खलित भाषणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे.त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुळे बेळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नेमले. 27 सप्टेंबर1929 रोजी त्यांचे निधन झाले.  

परांजपें यांनी सुमारे एक हजार राजकीय आणि सामाजिक लेख, लघुकथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली आहे.ते खालील प्रमाणे आहे.
* काळातील आणि स्वराज्यातील  निवडक निबंध (निबंध संग्रह 11 भागांमध्ये )
* मानाजीराव (नाटके)
* पहिला पांडव(नाटके)
* संगीत (कादंबरी)
* गोविंदाची गोष्ट(कादंबरी)
* विंध्याचल (कादंबरी )
रामायणातील काही विचार,मराठ्यांच्या लढायांचा इतिहास,ग्रंथ संपदा इत्यादी. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

एटीएममधून पैसे काढणे झाले महाग, आरबीआयचा नवीन नियम जाणून घ्या

Veer Tejaji :वीर तेजाजी मंदिरातील मूर्तींची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक

विश्वचषक पात्रता फेरीत ब्राझील फुटबॉल संघाचा पराभव,मुख्य प्रशिक्षकांना पदावरून काढले

चंद्रपुरात दर्शनासाठी गेलेल्या लोकांना मारहाण आणि लुटमार भाजप-मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सध्या महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

पुढील लेख
Show comments