Marathi Biodata Maker

ऐश्‍वर्याचा चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास नकार?

Webdunia
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017 (16:38 IST)
ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे. मात्र पुनरागमनानंतरही ऐश्‍वर्या फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. चित्रपटांच्या निवडीबाबत अत्यंत चोखंदळ झालेल्या ऐश्‍वर्याने स्मार्ट पद्धतीने चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवीसोबत “नरसिंहा रेड्डी’ या चित्रपटात भूमिका करण्यास ऐश्‍वर्याने नकार दिला. मुळात ऐश्‍वर्याने थेट नकार देण्याऐवजी आपल्या मानधनाचा आकडा प्रचंड वाढवून मागितला. तसे केल्याने झाकली मूठ राहत असल्याचा ऍशचा समज असला तरी तिचे सत्य उघड झाले आहेत.
 
ऐश्‍वर्याने कमबॅकनंतर फक्त तरुण अभिनेत्यांसोबत चित्रपट करण्यास पसंती दिली आहे. ऐश्‍वर्याने आतापर्यंत समकालीन किंवा वयस्क अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या आहेत. अगदी अलिकडेच ऐश्‍वर्या रायबरोबर आर. माधवन हा “फन्ने खान’मध्ये रोमॅंटिक भूमिका करणार असल्याचे समजले होते. मात्र माधवनने केलेल्या काही भन्नाट मागणीमुळे त्याच्या ऐवजी राजकुमार रावला घेण्यात आल्याचे अगदी अलिकडेच समजले आहे. ऐश्‍वर्या राय बच्चनच्या बरोबर राजकुमार राव….! कशी वाटते ही जोडी.
 
पण असो. माधवनने हा सिनेमा नक्की का सोडला या मागेही काही कारण आहे. तारखा जुळल्या नाहीत, असे स्पष्टिकरण माधवनकडून दिले गेले आहे. मात्र ते खरे कारण नाही, हे उघड आहे. माधवनने ऐश्‍वर्या रायबरोबरच्या या चित्रपटासाठी भरमसाठ मानधन मागितले होते. 15 दिवसांच्या शुटिंगसाठी त्याने 1.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र “फन्ने खान’च्या निर्मात्यांचे बजेट अगदीच जेमतेम असल्याने त्यांना माधवनच्या मागणीचा विचारही करणे शक्‍य झाले नाही.
 
आता ऐश्‍वर्याच्या बरोबर कोणत्या हिरोला उभे करायचे यासाठी चक्क ऑडिशन्स घेण्याची वेळ आली. त्यासाठी अक्षय ओबेरॉय, कार्तिक आर्यन आदींच्या ऑडिशन्स डायरेक्‍टर मुकेश छाब्रा यांनी घेतल्या. पण काही समिकरण जुळेना. मल्याळम सिनेमातल्या आदिल इब्राहिमसाठीही प्रयत्न झाले. मात्र ऐश्‍वर्याने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला. अखेर तिने राजकुमार राव बरोबर काम करायला होकार दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

जोधपूरमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ Mandore Garden

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत

पुढील लेख
Show comments