suvichar

अनुष्का आणि विराट झाले विवाहबद्ध

Webdunia
मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (09:07 IST)
गेल्या आठवड्याभरापासून चर्चा असलेला अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीचा विवाह आज खरोखर झाला. इटलीमध्ये तुस्कानी येथील रिसॉर्टमध्ये एका भव्य समारंभामध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. यावेळी दोघांच्याही कुटुंबियांसह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिसॉर्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश नाकारला होता. हा विवाह सोहळा 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
 
विराट आणि अनुष्काच्या विवाहाबाबत गेल्या आठवड्यांपासून वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. या दोघांचे आगोदरच लग्न झाले आहे, इथपासून त्यांचे लग्न होण्याची अफवाच आहे, इथपर्यंत सगळ्या बातम्यांना आज अखेर पूर्णविराम मिळाला. या दोघांच्या लग्नसमारंभाच्या तयारीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यातच अनुष्काचा लग्नाच्या तयारीतला फोटोही प्रसिद्ध झाला.
 
दोन्ही कुटुंबे इटलीला रवाना झाल्याचेही बघितले गेले होते. मात्र अनुष्काच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने हे वृत्त फेटाळल्याने संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होईपर्यंत ही संदिग्धता कायम राखली गेली. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मात्र ही खात्रीलायक बातमी लपवून ठेवता आली नव्हती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होते. त्यांनी एकत्र काही जाहिरातीही केल्या होत्या. त्यांच्या प्रेमप्रकरणावरून क्रिकेट आणि सिनेरसिकांनी पुष्कळ गॉसिपही केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

मे महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन? भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

संजय दत्तच्या 'आखरी सवाल' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली; चित्रपट आता या तारखेला प्रदर्शित होणार

डिलिव्हरी बॉयने रीवा अरोरासोबत गैरवर्तन केले, ज्यामुळे अभिनेत्रीला पोलिसांना बोलवावे लागले

७ दिवसात ५० कोटींचा टप्पा पार! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर कल्ला

शक्ती कपूर यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली

पुढील लेख
Show comments