Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरुख खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:02 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक संकटाचा सामना करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला एका प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. शाहरूख खान याच्याविरुद्ध दाखल याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २०१७ रोजी शाहरूख खान रईस या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना गुजरातच्या बडोदा रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. या प्रकरणी शाहरूख खान याच्या विरुद्ध दाखल याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
 
शाहरूख खानलाविरुद्ध २०१७ रोजी दाखल एका गुन्हेगारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळत दिलासा दिला आहे. रईस या चित्रपटाच्या प्रमोशनाचा भाग म्हणून शाहरूख खानने बडोदापर्यंत रेल्वेप्रवास केला होता. त्यादरम्यान रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. बडोदा स्थानकावर एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शाहरूखविरुद्ध कथितरित्या दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
 
न्यायमूर्ती निखिल करील यांनी शाहरूख खान विरुद्ध गुन्हेगारी प्रकरण आणि बडोद्याच्या एका न्यायालयाकडून त्याच्याविरुद्ध जारी समन्स फेटाळण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारली. खालच्या न्यायालयाने दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम २०४ अंतर्गत शाहरूख खानला समन्स जारी केला होता. त्यानंतर शाहरूख खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे वृत्त बाहेर येताच शाहरूख खान समर्थक आणि फॅन्सनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments