बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं असून या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला गेला आहे ज्यात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.