Marathi Biodata Maker

सैफ आणि करीनाने घेतला घर सोडण्याचा निर्णय, हे आहे कारण...

Webdunia
शनिवार, 25 जुलै 2020 (14:50 IST)
बॉलिवूडमधील कायम चर्चिल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan)आणि करीना कपूर खान(Actress Karina Kapoor Khan). चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येणारी ही जोडी सध्या त्यांच्या घरामुळे चर्चेत येत आहे. लवकरच हे दोघं त्यांच्या कुटुंबासोबत राहतं घर सोडून जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत सैफने याविषयी भाष्यदेखील केलं आहे.
 
सध्या लॉकडाउनचा काळ असल्यामुळे शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या काळतही काही वेळा सैफ आणि करीना घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले. यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोलदेखील केलं. मात्र सैफने घराबाहेर पडण्याचं कारणं सांगितलं आहे.
 
सैफ आणि करीना लवकरच त्यांचं राहतं घर सोडून कुटुंबासमवेत नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे सध्या या नव्या घरातील कामकाज कसं सुरु आहे हे पाहण्यासाठी त्यांना नव्या घरी सतत जावं लागत आहे.
 
सैफ आणि करीनाने ते सध्या राहत असलेल्या घराच्याच समोर एक नवीन घर घेतलं आहे. या घरात ते लवकर शिफ्ट होणार आहे. परंतु, सध्या या घराचं काम सुरु आहे. ते काम संपल्यावर सैफ त्याच्या कुटुंबासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे. तसंच सैफचं सध्याचं घर तो भाडेतत्वावर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 
दरम्यान, सैफ नुकताच ‘दिल बेचारा’ या चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटात तो कॅमिओ रोलमध्ये दिसला असून त्याने अभिमन्यू वीर ही भूमिका साकारली आहे. डिस्नी प्लस हॉटस्टॉरवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि हर्षद आत्मारामचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

राजकारणा नंतर थलपथी विजय आता 'जना नायकन' या चित्रपटाद्वारे चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार; हा चित्रपट विजयच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट

हिरवीगार जंगले, उंच पर्वत आणि शुद्ध हवा; जिथे भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम पंच केदार मध्यमहेश्वर

संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'चा ट्रेलर प्रदर्शित झाला, इतिहासातील एक न ऐकलेले सत्य उघड झाले

मे महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन? भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

पुढील लेख
Show comments