Festival Posters

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले कोमात, पत्नी म्हणाली - अनेक अवयव काम करत नाहीत, प्रकृती चिंताजनक

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (11:36 IST)
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. या अभिनेत्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मीडिया हाऊसला माहिती देताना त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की, बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. अभिनेत्याच्या विविध अवयवांनी काम करणे बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली. विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.
 
वृषाली यंनी सांगितले की, "ते प्रतिसाद देत नाहीये. आम्ही त्यांना स्पर्श करत असतानाही त्यांचे शरीर प्रतिसाद देत नाहीये. आता पुढे काय करायचे याचा निर्णय गुरुवारी सकाळी डॉक्टर घेतील. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली होती. तिथे गेल्यावर मात्र त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. त्यांना हृदय आणि किडनीसारख्या अनेक समस्या आहेत. सध्या त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे.
 
शिल्पा शेट्टी आणि अभिमन्यू दासानी यांच्यासोबत 'निकम्मा' चित्रपटात विक्रम शेवटचा दिसला होता. हा चित्रपट यावर्षी जूनमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यांनी वयाच्या 26 व्या वर्षी अमिताभ बच्चन अभिनीत 'परवाना' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 40 वर्षांच्या कारकिर्दीत विक्रम गोखले यांनी विविध मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
 
2010 मध्ये इष्टी या मराठी चित्रपटातील कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

उन्हाळ्यात भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या; जेथील थंड दऱ्या तुम्हाला देतील एक विलक्षण अनुभव

भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी, अक्षय कुमारने असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून घेतलेला मोठा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलू शकतो

मिर्झापूर: द मूव्ही हा सीझन ४ नसून एक नवीन अध्याय आहे, ज्यामध्ये नवीन कथा आणि मोठे बदल आहेत

पुढील लेख
Show comments