Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्याविषयी दुसरे काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2015 (12:50 IST)
‘तनू वेडस् मनू रिटनर्स’ या सिनेमाच्या यशानंतर बॉलिवूड क्वीन कंगनादेखील भलतीच चर्चेत आली आहे. कायमच आपल्या वेगळेपणामुळे खास ठसा उमटविणार्‍या कंगनाचं म्हणणं आहे की, दुसरे माझ्याबाबत काय विचार करतात याचा मला अजिबात फ़रक पडत नाही.
 
माझ्याविषयी इतर जण काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. त्यांचा विचार मी करत बसले असते तर आतापर्यंत टिकाव धरु शकले नसते. असं कंगनाने एका प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं.
 
आपण काय मिळवू शकतो आणि काय नाही याची मला चांगली समज आहे. जर मी इतरांच्या म्हणण्याने प्रभावित झाले असते तर माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं असतं, असंही कंगना म्हणाली.
 
‘फॅशन’ सिनेमासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘क्वीन’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments