Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या''

Webdunia
मुंबई- शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सुपरस्टार रजनीकांत हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी जोरदार मागणी धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.
 
विधानसभेत आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत अभिनेते रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी केली. मराठमोळ्या रजनीकांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेतील चित्रपटात मिळवलेले यश अङ्खलातून असेच आहे, असे गोटे म्हणाले. रजनीकांतच्या चित्रपटाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा असाच आहे. रजनीकांत महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देवून गौरव करावा तसेच त्यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही अनिल गोटे यांनी सभागृहात केली.
 
दरम्यान, रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 250 कोटींची कमाई केली आहे. ‘कबाली’ चित्रपट पाहण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, तमिळनाडू येथे सुटी जाहीर करण्यात आली होती.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments