पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल नुकताच पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे:
- चालू वर्षात विकास दर 7.2 टक्के राहणार - आगामी दोन वर्षात विकास दर 8.2 तर यानंतर नऊ टक्क्यांवर जाणार - चालू वर्षात कृषी विकास दर 0.2 टक्क्यांनी घसरण्याची भीती. - औद्योगिक उत्पादन दर 8.6 टक्के राहणार. - सेवा क्षेत्राचा 8.7 टक्के दराने विकास. - अन्न-धान्याचे वाढते दर अजून वाढण्याची भीती. - चालू वर्षात गुंतवणूक दर 36.2 टक्के राहणार. - निर्यात क्षेत्रातील विकास मंदावल्याने 168.7 अब्ज डॉलर निर्यात राहणार. - महसूल तोट्यात कपात करण्यासाठी प्रयत्नांची गरज. - उत्पादनात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्यास आयात करण्यास त्वरित परवानगी मिळाली पाहिजे. - अणू ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठी आयात वाढवावा.