suvichar

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (08:31 IST)
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १८ लाख ९४ हजार ८३९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.
 
याशिवाय, राज्यात मंगळवारी २ हजार २९४ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. याशिवाय, ५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आतापर्यंत राज्यात ५० हजार ५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, १हजार ९९६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख