Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त

4 thousand 516 patients
Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (08:31 IST)
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १८ लाख ९४ हजार ८३९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.
 
याशिवाय, राज्यात मंगळवारी २ हजार २९४ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. याशिवाय, ५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आतापर्यंत राज्यात ५० हजार ५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, १हजार ९९६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख