Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सोमवारी ८ हजार ७४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
मंगळवार, 9 मार्च 2021 (07:57 IST)
राज्यात सोमवारी ८ हजार ७४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा २.३६ टक्के इतका आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.२१ टक्के इतका झाला आहे. ९ हजार ६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात २० लाख ७७ हजार ११२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २२ लाख २८ हजार ४७१ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४१ हजार ७०२ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ९८ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यात सध्या ९७ हजार ६३७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ३३ लाख ४५ हजार ५८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सध्या ९ हजार ३७३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचबरोबर ठाण्यात आतापर्यंत २८ लाख ६३ हजार ३५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात सध्या १० हजार ३९७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या १ हजार १४८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर पुण्यात १९ हजार ३० कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
राज्यात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ५२९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या औरंगाबादमध्ये ४ हजार ४७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या १२ हजार २१९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments