Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तज्ञांचे मत , कोविड 19 ची लाट मंदावली,

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (21:51 IST)
नवी दिल्ली : भारतात कोविड 19 ची लहर मंदावली आहे असा दावा  प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी केला आहे.परंतु बहुधा ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त काळ टिकेल आणि जुलैपर्यंत चालू राहील. जमील अशोक विद्यापीठातील त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन कार्यक्रमात जमील यांनी सांगितले की कोविडची दुसरी लाट शिगेला पोहोचली आहे,  हे सांगणे फार घाईचे आहे.
जमील म्हणाले की संसर्गाची प्रकरणे कमी झाली असली तरी नंतरची परिस्थिती सोपी नसणार. बहुधा ते जास्त काळ टिकेल आणि जुलैपर्यंत चालू राहिल. याचा अर्थ असा की प्रकरणांमध्ये घट असूनही, दररोज मोठ्या प्रमाणात संक्रमणास सामोरे जावे लागणार.शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार कोविड 19 च्या दुसर्‍या लहरीतील प्रकरणे पहिल्या लहरी इतके लवकर कमी होणार नाही.
 
जमील म्हणाले की पहिल्या लाटेत आढळून आले की  प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. परंतु लक्षात ठेवा की यावर्षी आपल्याकडे संक्रमित लोकांची संख्या खूप जास्त आहे. 96,000 किंवा  97,000 प्रकरणं ऐवजी दिवसात आपल्याकडे  4,00,000 पेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे या लहरींमध्ये बराच काळ लागेल.
 
त्यांच्या मते, भारतात मृतांची संख्या पूर्णपणे चुकीची आहे. ते म्हणाले, "हे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा राज्याच्या चुकीच्या हेतूमुळे नाही." परंतु हे आम्ही ज्या प्रकारे रेकॉर्ड ठेवतो त्या कारणामुळे आहे. "
 
भारतात दुसरी लहर का आली, यावर चर्चा करतांना जमील म्हणाले की भारत सतत काहीतरी विशेष घडते आणि इथल्या लोकांमध्ये  विशेष रोगप्रतिकारक शक्ती आहे. 
 
ते म्हणाले  की,आपल्याला  हे माहिती आहे, आम्हाला लहानपणी बीसीजीची लस देण्यात आली होती. मलेरिया झाल्यावर अशा प्रकारे सर्व युक्तिवाद पुढे येत आहेत. बीसीजीची लस क्षयरोगापासून (टीबी) वाचण्यासाठी दिली जाते.ते म्हणाले की कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन न केल्याने लोकांनी संसर्गाला वाढवले आहे.
 
ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत प्रकरणे कमी होऊ लागले, आमचा विश्वास (रोग प्रतिकारांवर) सुरू झाला. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अनेक विवाहसोहळे झाले, ज्यात मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेतला. अशा घटना घडल्या ज्यामुळे संक्रमण वेगाने पसरला. त्या मध्ये  या निवडणूकीत सभा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील समाविष्ट आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments