Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस: उद्धव ठाकरे यांनी मांडलेले 11 महत्त्वाचे मुद्दे

Webdunia
रविवार, 26 एप्रिल 2020 (16:18 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अक्षय तृतीया, तसंच रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
 
तसंच, लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचे आभारही मानले.
 
ते म्हणाले, "नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
 
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
1. रमजानचा महिना सुरू झाला आहे. मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर नमाज करण्याची ही वेळ नाही. घरीच प्रार्थना करावी.
 
2. देव आता मंदिरात नाही, आपल्यामध्ये आहे. डॉक्टर, पोलीस यांच्या रुपात देव आला आहे. त्यांचा आदर करणं गरजेचं आहे.
 
3. आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो.
 
4. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
 
5. लॉकडाऊन संपवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. सरकार चहूबाजूंनी काम करत आहे.
 
 
7. मजुरांना लवकर गावी पाठवण्याची सोय करू. पण, अद्याप ट्रेन सुरू करण्यात येणार नाही.
 
8. कोटामध्ये राज्यातील विद्यार्थी आहेत, त्यांना तिथून वापस आणणार आहोत.
 
9. ग्रामीण भागात जिल्ह्याच्या वेशी बंदच राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत वाहतूक मात्र सुरू राहील.
 
10. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 लाख 8 हजार 972 चाचण्या केल्या आहेत. 1 लाख 1 हजार 162 जणांचे नमुने निगेटिव्ह आलेत. जवळपास 7 हजार 628 नमुने पॉझिटिव्ह आले आणि 323 रुग्णांचा मृत्यू झालाय.
 
11. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. कृषी माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments