suvichar

दिलासा : धारावीत एकही मृत्यू नाही

Webdunia
गुरूवार, 28 मे 2020 (09:42 IST)
मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावीमधून बुधवारी एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.
 
– बुधवारी राज्यात २,१९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली.
– महाराष्ट्रात करोनाचे एकूण रुग्ण ५६,९४८ आहेत. त्यात ३७,१२५ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.
– ९६४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत १७,९१७ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
– दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– मुंबईत ३४,०१८ करोना रुग्ण आहेत. त्यात ८४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २४,५०७ अजूनही अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments