Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक! मुंबईत आता २८ दिवसांनी कोरोनाबाधित दुप्पट

Webdunia
बुधवार, 17 जून 2020 (09:56 IST)
कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत आता २८ दिवसांवर पोहोचले आहे. २४ प्रशासकीय विभागांपैकी १८ विभागांत रुग्ण दुप्पट होण्यास २० दिवस व त्याहून अधिक कालावधी लागत आहे. तर दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाणही आता मुंबईत सरासरी २.४२ टक्क्यांवर आले आहे. आता केवळ दहिसर विभागात १३ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. 
 
मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने मे महिन्यात आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच पालिका प्रशासनाने ‘चेसिंग द वायरस’ ही मोहीम सुरू केली. त्यामुळे जून महिन्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २० वरून २४ दिवसांवर पोहोचले. या आठवड्यात हे प्रमाण आणखी वाढत आता २८ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा, धारावी, सायन-वडाळा आणि गोवंडी-मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. माटुंगा एफ उत्तर विभागात तर ६२ दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे.
 
कोरोनावर नियंत्रण
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या साहाय्यक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments