suvichar

कोरोना विषाणू : ४१ प्रवाशांपैकी ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (16:34 IST)
मुंबई विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपासणी - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोना विषाणूबाधित भागातून आलेल्या राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या 41 पैकी 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  
 
राज्यात बाधित भागातून १७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यामध्ये काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले. भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू

जळगाव प्रेमप्रकरण रक्तरंजित! १२ वर्षांच्या संसाराला गोळीचा शेवट

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments