Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मग राज्यासाठी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांनाही लिहा

Webdunia
मंगळवार, 19 मे 2020 (16:51 IST)
राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे सांगत आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला घेऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि पवारांवर टीका केली. “शरद पवार हे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी राज्यासाठी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहावे”, असा सल्लाच फडणवीस यांनी दिला आहे.
 
केंद्र सरकारने २० लाख कोटींचे भरभक्कम पॅकेज दिले. मात्र तरिही पवारांनी मदत अपुरी असल्याचे सांगितले. हे राजकारण नव्हते का? जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही सूचना मांडल्या तर ते राजकारण कसे असू शकते? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे शरद पवार हे केंद्राकडे मदतीसाठी पत्र लिहितात, त्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंनाही एक पत्र लिहावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments