Dharma Sangrah

आजपासून रेड, कंटेनमेंट वगळता ‘या’ जिल्ह्यात धावणार लालपरी

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (07:06 IST)
चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाला असून राज्य सरकारने यासाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार रेड आणि कंटेनमेंट क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात आजपासून अर्थात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल परब यांनी दिली आहे.
 
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत केवळ रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर जिल्ह्यांना सशर्त एसटी महामंडळाला केवळ जिल्हा अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा  सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील निवडक मार्गांवर शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू होणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी काही नियम देखील जारी करण्यात आले आहेत.
   
असे आहेत नियम 
जिल्हाअंतर्गत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments