Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगली बातमी ! 15 महिन्यानंतर राज्यात तिसरा जिल्हा कोरोनासंसर्गापासून मुक्त झाला

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (12:00 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित झाला.आता, हळूहळू परिस्थिती सामान्यतेकडे वळत आहे.आतापर्यंत तीन जिल्हे कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. भंडारा जिल्हा शुक्रवारी कोरोना मुक्त घोषित करण्यात आला.जिल्ह्यातील उपचारांखालील एकमेव रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी येथे एकही नवीन प्रकरण नोंदवले गेले नाही. 
 
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्न तसेच ट्रेसिंग चाचणी आणि उपचार यामुळे भंडारा 15 महिन्यांनंतर कोरोनाव्हायरसपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे.
 
उपचारांखालील एकमेव कोरोना पेशंटला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 578 लोकांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली.त्यापैकी कोणीही कोरोना संक्रमित आढळले नाही. 
 
“जिल्ह्यात आता कोरोना विषाणूचे एकही रुग्ण नाहीत,” असे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे.इथले जिल्हाधिकारी म्हणाले की, पूर्व महाराष्ट्रातील भंडाराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या आणि लोकांच्या सहकार्याच्या सामूहिक प्रयत्नांनी महत्वाची भूमिका बजावली. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आगामी काळात कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. "
 
तज्ज्ञ म्हणाले की,कोरोना विषाणू एक संसर्गजन्य रोग आहे आणि त्याचा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे.
 
ते म्हणाले की, साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक पावले उचलली आहेत.अधिकृत आकडेवारीनुसार,आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचे 59,809 रुग्ण आढळले आहेत. तसेच 1,133 मृत्यू मुखी झाले आहेत.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments