Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक बातमी !राज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात घट, 26 हजार नवीन प्रकरणे समोर आली

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (22:36 IST)
राज्यात दीर्घ काळापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सुमारे 26 हजार नवीन घटना समोर आल्या आहेत. तर  मृतांची संख्याही कमी झाली आहे. त्याचबरोबर राजधानी मुंबईतही कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. मुंबईत गेल्या एका दिवसात 1232 नवीन प्रकरणें नोंदले गेले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या  24 तासांत कोरोना विषाणूचे 26,616 नवीन प्रकरण आले.तर या काळात 516 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण प्रकरणांची संख्या वाढून 54,05,068 झाली आहे. मृतांचा आकडा ,वाढून 82,486वर पोहोचला आहे. आज, कोरोना आजाराशी लढून आणखी 48,211 रूग्ण बरे झाले आहेत, तर आत्तापर्यंत एकूण 48,74,582 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. 
महाराष्ट्रातील कोरोना टेस्टिंगची आकडेवारी पाहिल्यास, आज 234 ,416. लोकांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 31,338,407 तपास झाले आहेत. राज्याची राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 24 तासांत1,232 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर शहरातील एकूण रुग्णांची संख्या 689,062 वर पोहोचली. आज आजारामुळे 48 लोकांचे प्राण गमावले.
 
सोमवारी राज्यासमोर दुहेरी आव्हान आहे. सरकार बऱ्याच  काळापासून कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या प्रतिबंधात व्यस्त आहे, तर चक्रीवादळ तौक्ते ने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागातही सामना करावा लागला. त्यासाठी बीएमसीला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागली. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडझड होण्याच्या  घटना घडल्या आहेत. चक्रीवादळामुळे लसीकरण मोहीम देखील थांबविण्यात आले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments