Dharma Sangrah

लॉकडाऊनमध्ये लग्नात न येण्यासाठी निमंत्रण : फेसबुकवर पार पडला जवानाचा विवाह सोहळा

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (18:55 IST)
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यात या परिस्थितीतही एक लग्न पार पडलं. हा विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली होती. या लग्नात तब्बल 270 हून अधिक नातेवाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. याकरिता त्यांनी लग्नाला न येण्याचे निमंत्रण देखील दिले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी या गावातील अविनाश दोरुगडे आणि चंदगड तालुक्यातील कुदनुर गावातील रूपाली निर्मळकर या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. फक्त पुजारी आणि वधू वर हे तिघेजण याच या लग्नाला उपस्थित होते तेही मास्क बांधून. या तिघांनीही सोशल डिस्टन्स ठेवूनच हा विवाहसोहळा पार पाडला.

महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन फेसबुक अकाउंटवरून 270 व्हराडी या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी ऑनलाईन अक्षता टाकत वधू-वराला शुभेच्छा दिल्या. या जोडप्यांनी लग्नामध्ये जमलेला अहेर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments