suvichar

राज्यात बुधवारी कोरोनाचे 2,219 नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (09:14 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात बुधवारी  कोरोनाचे  2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के इतका झाला आहे.
 
 सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments